वारंवार तोंड येत असेल तर….अजिबात करू नका त्या गोष्टीकडे दुर्लक्ष….अन्यथा या गंभीर रोगांची लागण झालीच समजा

तोंड येणे ही सामान्य बाब वाटत असली तरी यामागे अनेक कारणे आहेत. साधारणत: ज्यांना पोटाशी संबंधित समस्या असतात अशा व्यक्तींना वरचेवर तोंड येत असते.तर काही जणांना खाण्यापिण्याच्या सवयीत बदल झाल्यामुळे अलर्जी होते. त्यामुळे तोंड येते. पण वरचेवर जरी ही सामान्य समस्या वाटत असली तरी तोंड आल्यामुळे उपासमारही होते. तिखट, तेलकट, तूपट, खारट, गरम पदार्थ खाता येत नाहीत. त्यामुळे भूक असूनही उपाशी राहावे लागते. पण काही घरगुती उपचार केल्यास ही समस्या सोडवता येते.

कारणे काय:-

शरीरात अतिरिक्त उष्णता वाढणे. एखाद्या आजारावर दीर्घकाळ औषधे घेत असल्यास त्या औषधांचे साईड इफेक्‍ट होऊनही तोंड येते. अति प्रमाणात चहा, कॉफी किंवा तंबाखूचे सेवन, अति धुम्रपान , अतिप्रमाणात तिखट, तेलकट व मसालेदार पदार्थ खाणे.

पचनाच्या तक्रारी असलेल्यांनाही तोंड वारंवार येते. विशेषतः पोट साफ नसल्यास दातांचे विकार असल्यास किंवा दात झिजून टोकदार झाल्यास ते लागून तोंडात व्रण उठतात.

कुपोषण किंवा जीवनसत्वाच्या अभावामुळेही तोंड येते.

आयुर्वेदात तोंड येण्यालाच ‘मुखपाक’ किंवा ‘सर्वसर’ असे म्हणतात. साधारणत: पित्त वाढले की तोंड येते असे सामान्यपणे समजले जाते. मात्र आचार्य वाग्भटांनी याचे वातज, पित्तज, कफज, रक्तज आणि सांनिपातिक असे पाच प्रकार सांगितले आहेत.

पित्तवर्धक आहार करणे, वेळी अवेळी जेवण करणे, फार काळ उपाशी राहणे, रात्री उशिरा जेवण करणे, दिवसभर अधिक प्रमाणात चहा घेणे, तंबाखू, पानमसाला, गुटखा इत्यादींचे सतत सेवन करणे तसेच रात्रीचे जागरण करणे,

अतिउष्ण पदार्थाचे सेवन करणे, आहारात तिखट व मिठाचे प्रमाण अधिक असणे, मांसाहार इत्यादी कारणांमुळे मुखाच्या आतल्या बाजूला किंवा ओठाच्या आतल्या बाजूला कधी कधी जिभेवर लहान लहान ‘गर’ उठतात. तेथील त्वचा सोलवटली जाते. जीभ जड होते.

तोंडाच्या हालचाली करण्यास त्रास होतो. अतिथंड किंवा उष्ण पदार्थाचा स्पर्श सहन होत नाही. शब्दांचे उच्चार स्पष्ट होत नाहीत. अशी एक वा अनेक लक्षणे दिसू लागली की समजावे आपल्याला तोंड आले आहे.

काहींना तर यामुळे ओठांवर ‘जर’ उठू लागतात. मात्र हे ‘जर’ वेगळे व तोंडाच्या आतील ‘गर’ वेगळे.  बहुतांशी मुखपाकांचे कारण हे पोटात दडलेले असते. ज्याप्रमाणे आपली जीभ हा आपल्या पोटाचा आरसा आहे असे समजले जाते त्याचप्रमाणे आपल्या जिभेवर, ओठांवर अथवा गालाच्या आतल्या बाजूला आलेले मुखपाक हे बिघडलेल्या पोटाचे द्योतक आहेत.

पण  बरेच दिवस असणारे, स्राव असणारे, ज्यांच्या कडा जाड झाल्या आहेत असे मुखपाक वेळीच तपासून घ्यावेत. कारण बऱ्याचदा यांचे रूपांतर भविष्यात कर्करोगामध्ये होण्याची शक्यता असते किंवा हे इतर एखाद्या पोटाच्या मोठय़ा आजाराचेही द्योतक असू शकतात. अशा प्रकारांत सततचे तंबाखू, गुटखा अशा अमली पदार्थाचे सेवन हा हेतूसुद्धा असू शकतो.

मात्र प्रत्येक मुखापाक हा वेगळा समजून त्याचे निदान शोधून वैद्याच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे हाच याच्या त्रासापासून कायम मुक्त होण्याचा मार्ग आहे. कारण ताप अधिक दिवस राहिला, अंगात मुरला तरी तोंड येते.

म्हणून प्रत्येक प्रकारानुसार त्याची चिकित्सा बदलते. पण साधारणत: सामान्य कारण जाणवल्यास पूर्वीच्या काळी  घरगुती औषधांमध्ये जाईची पाने चघळण्यासाठी दिली जात असत. त्याने लाळ गाळली की मुखपाक दोन दिवसांत बरा होत असे. मध लावणे, तूप लावणे, तोंडले खाणे असे उपचार काही क्षणिक कारणांनी उत्पन्न मुखपाकात तात्काळ आराम देतात.

थंड पाण्यात मध मिसळून त्याने गुळण्या केल्यानेही लगेच आराम पडतो. तुरटीच्या पाण्याने गुळण्या केल्यासही मुखापक लवकर बरा होतो. काहींना पडलेले व्रण कित्येक दिवस बरेच होत नाहीत. काहींचे काहीही औषध न घेताच दोन-तीन दिवसांत बरे होतात. तर काही मुखपाकांसाठी वैद्याच्या सल्ल्याने औषधे घेणे केव्हाही चांगले.

बहुतांशी मुखपाकाचे कारण हे बिघडलेले पोट असते, म्हणून प्रथम आपली पचनशक्ती चांगली करण्याकडे लक्ष द्यावे. लक्षात ठेवा अनेक आजारांत लक्षण स्वरूपात मुखपाक होत असतो म्हणून प्रत्येक मुखापाकाचे कारण शोधून चिकित्सा करावी तसेच सर्वच विकारांत प्रथम तोंडचे विकार बरे करावेत. कारण मुखामध्ये आपल्या अन्नपचन प्रक्रियेची सुरुवात होत असते. ही सुरुवातच बिघडल्यास अन्नपचन प्रक्रियाच बिघडू लागते व छोटा वाटणारा हा आजार भविष्यात पोटाच्या एखाद्या मोठय़ा आजाराला निमंत्रण देतो.


Posted

in

by

Tags: