जर आपण सुद्धा गूळ खात असाल…तर सावध व्हा त्याआधी या गोष्टी जाणून घ्या…अन्यथा आपल्याला अनेक गंभीर रोगांचा सामना करावा लागू शकतो

हिवाळा सुरु होताच आपल्याला स्वत:ला सुदृढ व निरोगी ठेवण्यासाठी आपल्या दैनंदिन दिनक्रमात अनेक विविध बदल करावे लागतात. कारण असं म्हटलं जातं की, हिवाळा हा रोगांचा ऋतू आहे. या काळात अनेक साथीचे रोग डोकी वर काढतात. त्यामुळे थोडासा बेजबाबदारपणा देखील आपल्याला आजारांच्या विळख्यात फसवू शकतो.
त्यामुळे या काळात खाणपानाच्या सवयींमध्ये बदल करणं अत्यंत आवश्यक असतं. हिवाळ्यात अशा अनेक पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो जे आपलं आरोग्य मजबूत बनवतात व सोबतच अनेक गंभीर आजारांचा धोका देखील कमी करतात.
आपल्याला माहित आहे की गूळ हे एक उत्तम खाद्य आहे. हे आपल्या शरीरास डिटॉक्सिफाय करण्यास मदत करते. हे कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, पोटॅशियम, जस्त, प्रथिने, व्हिटॅमिन बी इत्यादी घटक यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. पण गुळाचा प्रभाव मात्र खूप गरम मानला जातो, म्हणून तो थंड दिवसात सेवन केला पाहिजे.
आपल्याला माहिती आहे की गुळ आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे. आपले आरोग्य लक्षात घेता आपण हिवाळ्यामध्ये गुळापासून बनवलेले पदार्थ खातो. परंतु आपण ज्याप्रकारचा गुळ खातो तो योग्य प्रकारे न तपासल्यास त्याचा आपल्या आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो.
होय, आजकाल बाजारात बनावट गूळचा व्यवसाय शिगेला पोहचला आहे. लोक कमी पैशासाठी लोकांच्या शरीरासोबत आजकाल खेळत आहेत. अशा परिस्थितीत आपण सावध असणे आवश्यक आहे.
कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट असे घटक सहसा भेसळयुक्त गुळामध्ये टाकले जातात जे आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहेत.
कॅल्शियम कार्बोनेट गुळामध्ये जोडला जातो ज्यामुळे त्या गुळाचे वजन भरपूर प्रमाणत वाढते. त्याच वेळी, सोडियम बायकार्बोनेटचा पिवळा रंग त्यामध्ये टाकल्यामुळे आपल्याला हा गूळ खूप आकर्षक वाटतो.
गूळ खरेदी करताना आपण लक्षात घ्या की ज्यांचा रंग जास्त तपकिरी असेल तोच गूळ नेहमी निवडा. पिवळ्या किंवा हलका तपकिरी रंगाचा गूळ निवडू नका, त्यामध्ये भरपूर प्रमाणत भेसळ असू शकते.
उसाचा रस हा एका मोठ्या कड्यामध्ये उकळला जातो या कालावधीत उसाच्या रसातील काही अशुद्धतेमुळे आणि उकळल्या मुळे होणार्या रासायनिक प्रतिक्रियांमुळे त्याचा रंग गडद लाल किंवा तपकिरी होतो. यानंतर, त्यात काही नैसर्गिक गोष्टी जोडून अशुद्धता काढून टाकल्या जातात.
या प्रकरणात, त्याचा रंग फारसा बदलत नाही, परंतु आपल्याला बाजारात पांढरा, हलका पिवळ्या रंगाचा गूळ मिळतो जर आपण हा गूळ पाण्यात ठेवला तर त्यामधील भेसळयुक्त पदार्थ पाण्याखाली जाऊन बसतील, तर शुद्ध गूळ पाण्यात पूर्णपणे विरघळेल.