जाणून घ्या तुळशीच्या पानांमध्ये असलेले आरोग्यदायी फायदे…अशा प्रकारे पानांचे उपाय करून होऊ शकतात अनेक रोग दूर

हिंदू धर्मात तुळशीला फक्त एका रोपाच्या दृष्टीने न पाहता देवाच्या स्थानी मानून पुजा केली जाते. तुळशीच्या घरात असण्याने फक्त सकारात्मक उर्जाच प्राप्त होत नाही, तर ब-याच आजारांपासून आपल्याला सुटका देखील मिळते. तसेच आयुर्वेदामध्येही गुणकारी तुळशीचे मोठे योगदान आहे.

प्रतीकात्मक तस्वीर

घराच्या अंगणात आणि बाल्कनीत लावली जाणारी तुळस हिंदू धर्मात पुजनीय आणि पवित्र मानली जाते. तुळस हे फक्त एक हिरवं रोप नसून तिच्यातील अनेक औषधी गुणधर्मांमुळे गंभीर रोगांशीदेखील सामना करणं सोपं होतं म्हणूनच तिला ‘क्वीन ऑफ हर्ब्स’ देखील म्हटलं जातं. विविध आजांरावर गुणकारी असणारी ही तुळस सौंदर्याच्या दृष्टीने त्वचा आणि केस यासाठीही लाभदायक ठरते.

हिंदु धर्मातील घराघरांत तुळशीची सकाळ संध्याकाळ पुजा केली जाते. तुळशीची पाने घरगुती उपायांमध्येही वापरली जातात. त्याचा सुगंधही खूप सुंदर असतो. तसेच काही खाद्यपदार्थांमध्येही त्याचा वापर केला जातो. तर आज आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत की, तुळशीत कोणकोणते गुणधर्म आहेत आणि त्याचा वापर कुठे कुठे केला जातो?

प्रतीकात्मक तस्वीर

रोगप्रतिकारकक्षमता वाढवण्यासाठी:-

तुळशीच्या बियांमध्ये फ्लेवोनाईड आणि फेलोनिक असल्याने ते आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करतात. तुळशीमध्ये असणारे अॅंटीऑक्सिडंट शरीराला होणा-या फ्री रेडीकल्सच्या प्रभावापासून संरक्षित करतात.

जर तुम्ही रोज दिवसातून एकदा जरी तुळशीची पाने चघळलीत किंवा त्याचा पानांचा चहा करुन प्यायला तर त्यापासून तुमच्या शरीराला अनेक चांगले फायदे होऊ शकतात. कारण आपली व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत असेल तर आपण कोणत्याही आजाराचा सामना सहज करू शकतो.

प्रतीकात्मक तस्वीर

तर सर्दी-पडसं हा खूपच साधा आजार आहे पण यामुळे लोकं अगदी हैराण होतात. पण तुळशीच्या मदतीने तुम्ही सर्दी-पडश्याला बरं करण्यासोबतच त्यापासून कायमची सुटका देखील मिळवू शकता. तुळशीतील अॅंटीस्पास्मोडीक घटक सर्दी-पडश्यापासून मुक्तता मिळवून देतात. तसंच तुळस तापासाठी देखील उपयुक्त मानली जाते.

तापाची तीव्रता अधिक असल्यास अर्धा लीटर पाण्यात वेलची पावडर, साखर आणि दूध याबरोबर तुळशीची पाने उकळून घ्यावी. तीन तासांच्या अंतराने हा काढा रुगणाला दिल्यास ताप कमी होतो. यासोबतच तुळशी, काळेमिरे आणि खडीसाखर मिसळून प्यायल्यानेही सर्दी-पडसे ठिक होते.

प्रतीकात्मक तस्वीर

डोकेदुखी व तणावातून सुटका:-

या धावपळीच्या जगात बरेच लोक मानसिक त्रासातून जात असल्यामुळे ते नकळतच तणावयुक्त जीवन जगताना दिसतात. ब-याचदा औषधांचा काहीही उपयोग न झाल्याने ते लोक घरघूती उपचार करतात. तुळशीच्या पानांमध्ये अॅंटीस्ट्रेससारखे घटक उपलब्ध असतात. त्यामुळे ते माणसाला मानसिक तणावातून मुक्त करतात.

तसेच तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने तणावातून येणा-या नकारात्मक विचांरावर मात करणे देखील सोपे होते. तुळशीची पाने डोकेदुखीवरील रामबाण उपाय म्हणून ओळखली जातात. तुळशीच्या वाळलेल्या पानांची गरम पाण्यात वाफ घेणे हा सर्वात चांगला उपाय आहे. त्यासाठी एक चमचा वाळलेली तुळशीची पाने दोन कप पाण्यात टाकून एका मोठ्या भांड्यात गरम करावे. एका मोठ्या कपड्याने चेहरा झाकून त्याची 5 ते 10 मिनिटे वाफ घ्यावी. तसेच तुळशीची पाने वाटून चंदनाच्या लेपाबरोबर डोक्यावर लावणेही उत्तम


Posted

in

by

Tags: