जाणून घ्या आपले रात्रीचे जेवण कसे असावे पण जर आपण सुद्धा या पद्धतीने जेवण करत असाल…तर सावधान भविष्यात अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागेल

भात आणि चपाती एकत्र खाण्याची ही पद्धत भारतात तशी फार जुनी आणि जास्त पाळली जाणारी आहे. जास्तीत जास्त लोक जेव्हाही जेवण करतात तेव्हा भात आणि चपाती एकत्रच खातात.
पण ज्यावेळी पाचन तंत्र कमजोर होऊ लागतं किंवा वजन कमी करण्याचा विषय निघतो, तेव्हा लोकांना या प्रश्नाबाबत जाणून घ्यायचं असतं. डाएट एक्सपर्ट्स सांगतात की, एकत्र भात आणि चपाती खाणं आरोग्यसाठी चांगलं नाही. चला तर मग जाणून घेऊ याबाबत आणखी काही गोष्टी…
द हेल्थ साइट डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, भात-चपाती एकत्र का खाऊ नये? असा प्रश्न विचारला गेल्यावर याचा थेट संबंध कॅलरी काऊंटशी जोडला जातो. कारण जेव्हा आपण भात आणि चपाती एकत्र खाण्याचा विषय येतो तेव्हा आपण मोठ्या प्रमाणात कॅलरी घेत असता. आणि आपण अधिक कॅलरी असलेला आहार घेता तेव्हा पचन तंत्रांवर अधिक जोर पडतो.
जर आपण भात आणि चपाती एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया कमजोर होते. तसेच आपल्या शरीरात फॅट जमा होऊ लागतं आणि यानेच पुढे लठ्ठपणाची समस्या होते.
जर आपण ही असंच काहीसं करत असाल आणि आपल्याला वजन कमी करायचं असेल तर ही पद्धत वेळीच बंद करा. काही रिसर्चमधूनही ही बाब समोर आली की, भात आणि चपाती जेव्हाही खायची असेल तर दोन्हीपैकी एकच एकावेळी खावं.
भात खाल्ल्याने अनेकांचं पोट फुगतं ही समस्या असलेल्या लोकांनी तर अजिबात भात खाऊ नये असे सांगितले जाते. कारण भात खाल्ल्याने त्यांना अधिक समस्या होऊ शकते.
तसेच त्यांना भात पचण्यासही अधिक वेळ लागतो. अनेकांना भाताची अॅलर्जी असते. डायबिटीसच्या रूग्णांनी भात खाऊ नये असे सांगितले जाते. तसेच अस्थमा असलेल्या लोकांनी सुद्धा भात खाऊ नये. याने श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
भात आणि चपाती दोन्हीत फॉलेट असतं. दोन्हीत पाण्यात विरघळणारं व्हिटॅमिन बी असतं, जे डीएनए आणि अन्य कोशिकांसाठी उपयोगी असतं. दोहोंमध्ये लोह समान प्रमाणात असतं. पण भातात फॉस्फोरस आणि मॅग्नेशिअमचं प्रमाण चपातीपेक्षा थोडं कमी असत. फॉस्फोरस तांबड्या पेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं. मॅग्नेशिअम रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवतं.
रात्री फक्त भाकरी खावी:- आहारतज्ज्ञ आणि आरोग्य तज्ञांचा असा विश्वास आहे की आपण रात्री फक्त भाकरीच खावी कारण भाकरी आपल्याला सहज पचते, रात्री आपली पचन प्रक्रिया मंद असते म्हणून हलके जेवण घ्यावे. जर आपण रात्री भाकरीसह भात खाल्ला तर ते आपल्यासाठी भारी पडेल. यामुळे आपल्याला पोटाशी संबंधित समस्या उद्भवतात.
भात खाल्ल्याने बद्धकोष्ठताची समस्या:-जे लोक रात्री भात खातात त्यांना बद्धकोष्ठताची समस्या उद्भवू शकते. यामुळे अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात.
आपले हे परंपरागत भोजन फार शास्त्रशुद्ध आहे. सर्वात प्रथम थोडा वरण भात तुपासह खावा. जमल्यास त्यांवर थोडे लिंबु पिळावे. असे केल्यास जिभेची रुची वाढते. त्यानंतरच चपाती किंवा पोळी/भाकरी खावी. पोळी पचण्यास जरा जड असते. भातानंतर भूक राहिली तरच पुढे जाऊन पोळी खावी. कोशिंबिर व चटणी वगैरे गोष्टी पोटातील पाचकरसांचे प्रमाण वाढवतात व पोट संतुष्ट होते.