गंगा नदीचे पानी कधीच खराब का नाही होत, काय आहे त्यामागील शास्त्र ,बघा सत्य आले समोर

स्वच्छ पाणी ही मानवाची मूलभूत गरज आहे. पूर्वीच्या काळी लोक नद्या व विहिरींचे पाणी पित असत. हे पाणी देखील स्वच्छ होते. पण आता हेच पाणी पिण्यायोग्य नाही. परंतु, गंगा, भारताची पवित्र नदी आहे तिचे पाणी पाण्याचा बाटलीत अनेक वर्ष ठेवले तरी हे पाणी खराब होत  नाही, त्यात किडे होत नाहीत, त्यामध्ये दुर्गंधी पसरत नाही.

तरीही, गंगेचे पाणी का खराब होत नाही असे काय कारण आहे? त्यात काही दैवी शक्ती आहे का? आम्ही याबद्दल तपशीलवार माहिती देत आहोत

गंगा नदीचा उगम गंगोत्री मध्ये होतो. गंगा नदीची पावित्रता व उगम याबद्दल अनेक कथा अस्तित्त्वात आहेत. गंगेमध्ये आंघोळ करुन पापं वाहून जातात अशी एक संकल्पना आहे. असे म्हटले जाते की भगवान भागीरथांमुळे गंगा पृथ्वीवर आली. गंगा नदी  शिवाच्या मस्तकावर असल्याचे मानले जाते.

जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणारअसेल , तेव्हा त्याला गंगेचे पाणी दिले जाते जेणेकरून त्याच्या आत्म्यास शांती मिळेल आणि तो स्वर्गात जाऊ शकेल. यासाठी जेव्हा लोक गंगा स्नानासाठी जातात तेव्हा ते बाटली किंवा इतर कोणतेही भांडे घेऊन गंगेचे पाणी त्यात भरतात व ते घरी ठेवतात. हे पाणी पूजेच्या वेळी खूप वापरले जाते. वर्षानुवर्षे ठेवल्यानंतरही या पाण्यात कोणताही कीडे  किंवा कीटक होत नाही.

काही लोक निसर्गाचा करिष्मा मानतात

काही लोकांचे असे मानने आहे कि पाणी खराब न होणे हा निसर्गाचा चमत्कार आहे . लोक म्हणतात की आई गंगाच्या दैवी सामर्थ्यामुळे गंगे  चे पाणी कधीच खराब होत नाही. शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केले असले तरी,त्यामध्ये असे आढळले की गंगेच्या पाण्यात एक व्हायरस आहे जो पाणी खराब होऊ देत नाही. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की गंगेच्या पाण्यात हा विषाणू उपस्थित असून पाणी स्वच्छ ठेवतो . यामुळे पाणी खराब होत नाही .

इतिहासाची पाने पाहिली तर लक्षात येईल की  १८९० मध्ये जेव्हा अर्नेस्ट हॅकिंग गंगेच्या पाण्यावर संशोधन करीत होते तेव्हा त्यावेळी देशात एक भयानक साथीची महामारी पसरली होती . हैजाचा प्रादुर्भाव सर्वत्र होता.हैजा मुळे ज्यांचा मृत्यू होत होता त्यांचे  मृतदेह गंगा नदीत सोडले जात होते. नदीत स्नान करणार्‍यां लोकांचा मृतदेह संपर्कात आल्यास त्यांना ही हैजा होऊ शकेल अशी भीती हॅकिंगची होती.

परंतु जेव्हा हॅकिंगने त्यांचे संशोधन पूर्ण केले तेव्हा त्यांना समजले की असे होऊन ही गंगेचे पाणी अद्याप शुद्ध आहे. या पाण्यात कोणतेही जीवाणू किंवा बॅक्टेरिया अस्तित्वात नव्हते.
हॅकिंगने सुमारे 20 वर्षे गंगेच्या पाण्यावर संशोधन केले. यावेळी त्यांना आढळले की गंगेच्या पाण्यात एक व्हायरस आहे जो पाणी खराब होऊ देत नाही.

त्याने या विषाणूचे नाव ‘निन्जा व्हायरस’ ठेवले. नुकत्याच झालेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की निन्जा विषाणूमुळे पाण्यात बॅक्टेरिया राहत नाही . यामुळेच गंगेचे पाणी नेहमी शुद्ध असते आणि कधीही खराब होत नाही.


Posted

in

by

Tags: